
पुणे ( प्रतिनिधी ) : वसुधा फाऊंडेशन, पुणे आयोजित ‘आपडी थापडी’ बालकाव्यसंग्रह’आणि ‘वसुधाचे कथा वैभव’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा, बक्षीस वितरण आणि राज्यस्तरीत भव्य बालकवि संमेलन सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले .
वसुधा फाउंडेशन आयोजित कथा स्पर्धेचे परीक्षण श्री. शशिकांत सुतार आणि श्री. दिलीप घाटे, श्री. राजेश्वर हेंद्रे, श्री. रामदास तांबे यांनी केले.
सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ.ललिता सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बालविश्वाला आनंद देणाऱ्या दोन्ही पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. ॲड. अब्दुल शेख वकील, मा. पोलीस इन्स्पेक्टर आणि दिग्दर्शक मा. पुंडलिक धुमाळ यांनी बालसाहित्य निर्मितीचे कौतुक केले.शेख सरांनी अशी बालकवीसंमेलने प्रत्येक गावात झाली तर गुन्हेगारी होणारच नाही.कविता करणारा माणूस संवेदनशील असतो.संवेदनशील माणूस माणसांवर प्रेम करतो.असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून कवी व राष्ट्रपती पोलीस पदक विजेते मा. सिताराम नरके, शिक्षक मा. काळुराम वाघचौरे आणि निसर्गकवी मा. लक्ष्मण शिंदे यांनी आपले विचार मांडले. वसुधा फौंडेशनच्या सर्वेसर्वा वसुधा नाईक यांच्या
कार्याचे कौतुक केले.मा. लक्ष्मण शिंदे सरांची ‘ झाडाची आरती ‘ ही कविता रसिकांच्या मनावर नेहमीच राज्य करते.
मा.सीताराम नरके सरांची काव्य प्रतिभा पहायला मिळाली. त्यांच्या आवाजाला एक वेगळीच धार आहे.
मा. पुंडलिक धुमाळ यांनी उत्तम कथानकाला नक्कीच दिग्दर्शक म्हणून न्याय मिळवून देईन असे स्पष्ट केले.
मा. काळुराम वाघचौरे सरांनी सर्व बालकांना उद्देशून समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. आणि वसुधा फौंडेशनला मदतीचा हात दिला.
मा. ललिता सबनीस,( बाल साहित्यिक ) यांनी वसुधा फौंडेशनने राबवलेल्या कथा स्पर्धेचे कौतुक तर केलेच पण सर्व लिहित्या हातांना शाबासकी दिली. बालकविंना मोलाचे मार्गदर्शन केले. राजयुवा प्रकाशनची माहिती दिली. आणि गोड भाषेत सर्वांचेच कौतुक केले.
मा. मधुसूदन घाणेकर (विश्वगुरू ), मा. प्रिया दामले ( प्रतीक्षा इंटरनॅशनल संस्था), मा. सारिका उर्फ मधुकर्णिका यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा व संस्थापिका सौ. वसुधा वैभव नाईक यांनी फाऊंडेशनच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्याचा आढावा दिला.सर्व बालकांना कवितेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
मा. गजाजन उफाडे यांनी बहारदार निवेदन केले.त्यांच्या निवेदन म्हणजे हसत खेळत सर्वांची अचूक ओळख करून देणे… हे त्यांचे वैशिष्ट आहे.
या कार्यक्रमात एकूण तीस बालकवींनी आपली कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
यात खालील निमंत्रित बालकवी उपस्थित होते.
कु. वीरा संदीप दरेकर, कु. मंदार शेखर भोंडवे, कु. श्रावणी नितीनकुमार गुरव, कु. मृणाल प्रदीप ताग्हाणे, कु. श्रेयशी वैभव कांबळे, कु. सिद्धी नितीन बिडकर, कु. अनुष्का सुरेश लांडे, कु. यश सुशील यादव, कु. वेदिका दीपक सावंत, कु. श्रीराम विठ्ठल पवार, कु. अस्मिता सचिन रांजणे, कु. संस्कृती नवनाथ खुटवड, कु. सारिका गणेश सोंडकर, कु. प्रांजल रोहिदास मोरे, कु. ईश्वरी बाळासाहेब खोपडे, कु. आर्या ढोके, कु. श्रावणी लोहार, कु. पार्थ श्रीराम घडे, कु. गायत्री रसाळ, कु. माधुरी गिरी, कु. युवराज मोरे, कु. राधिका सोनवणे, कु. मृण्मयी काळे, कु. अजया मुळीक, कु. ईशिका शोभेश दोडमणी आणि कु. रुपाली चव्हाण, दुर्वेश परदेशी यांनी काव्य सादरीकरण केले.
सर्व बालकांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कथा स्पर्धेसाठी मा.योगेश हरणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर मा मा. गौरव पुंडे यांच्या ‘गौरवाचे पत्र ‘ या वसुधावरील पत्ररूपी लेखनाने रसिकांच्या मनात वसुधा फाउंडेशन बद्दल घर केले. आदर निर्माण केला.
तर गायत्री रसाळ या नाईक बाईंच्या विद्यार्थिनीने नाईक बाई यांच्या बद्दल जे सांगितले त्यामुळे सर्वांच्या नयनी प्रेमळ अश्रू आले हे निश्चितआहे.
या कार्यक्रम साठी आलेल्या सर्व शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे त्याचप्रमाणे सर्व रसिकांचे तसेच कथा स्पर्धेतील लेखक सर्वांचे,तसेच वसुधा फाउंडेशनच्या सर्वेसर्वा वसुधा नाईक यांच्या वहिनी कल्पवंती आणि भाची अपूर्वा यांनी तोंड भरून कौतुक केले.
तसेच पती वैभव यांची मोलाची साथ लाभली
शीतल शर्मा हिने उपस्थित
सर्वांचे गोड शब्दात आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक योगेश हरणे , गौरव पुंड, श्रीराम घडे, कोमल नाईक, शीतल शर्मा, सायली ढेबे, मयुरी पुंडे आणि राधिका परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
वसुधा वैभव नाईक. पुणे

